दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. जावडेकर म्हणाले की, केजरीवाल पूर्णपणे उघडे पडले आहेत. कोणत्याही प्रकारचा बहाणा केजरीवालांचा चालणार नाही. दिल्लीतील जनता भाजपच्या हातात साता देईल असा दावा त्यांनी केला.
पुढे जावडेकर म्हणाले की, आता दिल्लीत ट्रिपल इंजिन सरकार स्थापन केले जाईल. केजरीवाल सरकारने राजकीय गैरकारभारामुळे मोदी सरकारची योजना दिल्लीत लागू होऊ दिली नाही असा आरोप त्यांनी केला.
आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या अनेक योजनांवर दिल्ली सरकारने बंदी घातली, ज्यामुळे सर्वसामान्यांना तोटा झाला असा आरोप त्यांनी केला.