नवी दिल्ली – भारताच्या उत्तर-पुर्व भागात असलेल्या राज्यांमध्ये जापान 13 हजार कोटींची गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे वृत्त केंद्र सरकारच्या प्रवक्त्यांनी बुधवारी दिले असुन जापान ही गुंतवणूक सध्या सुरू असणाऱ्या आणि इतर नविन प्रकल्पांमध्ये करणार आहे.
या संदर्भात बोलताना जितेंद्र सिंग (विशेष अधिकारी उत्तर-पुर्व विकास आराखडा) यांनी सांगितले की, जापान गेल्या तीन ते चार वर्षांपासुन भारतातील या भागातील राज्यांच्या विकासा मध्ये महत्वाची भुमिका घेत असुन जापानच्या या निर्णयाचे स्वागत आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, या भागातील मुलभुत विकास योजनांवर भर दिला जात असुन आगामी काळात या ठिकाणी अनेक नव्या योजना राबविण्यात येणार असुन ज्यात या भागात सर्वात जास्त येणाऱ्या पिकांमधील बांबु संबंधीत नवीन योजना असल्याचेही त्यांनी जापानच्या शिष्ट मंडळाशी झालेल्या भेटी नंतर बोलताना सांगितले.
यावेळी इतर योजनांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, आसाम येथील गुवाहटी येथील पाणी पुरवठा आणि शुद्धीकरण या महत्वाच्या योजनेत देखील सहभागी असुन आसामला उत्तर-पुर्व राज्यांशी जोडण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या नविन रस्त्यांमध्येही आपला सहभाग नोंदवणार आहे. त्याच बरोबर मेघालय, सिक्कीम आणि त्रिपुरा या भागात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या जंगलांच्या संरक्षण आणि देखभाली संदर्भात तयार करण्यात येणाऱ्या नविन योजनेत देखील ते सहभागी असल्याचे जितेंद्र सिंग यांनी सांगितले.