पणजी – कोरोना संकटाविरोधात लढण्यासाठी संपूर्ण देशवासीय एकवटले असून आज देशभरामध्ये उस्फुर्तरित्या जनता कर्फ्यू पाळण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिवशी जनतेने आपापल्या घराबाहेर निघू नये असं आवाहन केलं होतं त्याला देशवासीयांनी प्रतिसाद देत जनता कर्फ्यू यशस्वी केला. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार देशभरामध्ये आज रात्रौ ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. मात्र गोवा सरकारने राज्यामध्ये जनता कर्फ्यू आणखी ३ दिवसांसाठी पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री सचिन सावंत यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. यामुळं गोव्यामध्ये पुढील ३ दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून नागरिकांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आजप्रमाणे आणखी ३ दिवस आपल्या घरांमधून बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
The Goa government has extended the #JanataCurfew by three more days: Goa CM Pramod Sawant to ANI (file pic) pic.twitter.com/1BrzNWq9Xc
— ANI (@ANI) March 22, 2020