जीनिव्हा – जम्मू काश्मीर हा भारताचाच भाग असल्याची कबुली अखेर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी जीनिव्हामध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे. याबरोबरच त्यांनी भारतावर अनेक खोटे आरोप केले आहेत. ते म्हणतात की भारताने मानवाधिकारांचं उल्लंघन करण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकिस्ताननने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर (UNHRC) भारताविरोधात ११५ पानांचं डॉजिअर सादर करत भारतावर खोटे आरोप लावले आहेत. काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासमोर आपली बाजू मांडली.
#WATCH: Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi mentions Kashmir as “Indian State of Jammu and Kashmir” in Geneva pic.twitter.com/kCc3VDzVuN
— ANI (@ANI) September 10, 2019
काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा नसल्याचे यावेळी पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर बोलताना काश्मीरच्या मुद्द्यावरुन भारताविरोधात तथ्यहिन आरोप केले आहेत. काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी संयुक्त तपास समितीची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये ७ ते १० लाख सैनिक तैनात असून जगातील सर्वात मोठा कैदखाना असल्याची टीका कुरैशी यांनी केली आहे. काश्मीरमध्ये सहा हजारांहून जास्त नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याचे खोटे आरोप त्यांनी भारतावर केले आहेत. काश्मीरमध्ये पेलेट गनचा वापर बंद करण्यात यावा आणि कर्फ्यू हटवण्यात यावा अशी मागणी त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे केली.
भारताने काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाल्याचा दावा केला आहे. मग भारत काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि संस्थांना जाण्याची परवानगी का देत नाही ? कारण त्यांना माहिती आहे असे केले तर सत्य जगासमोर येईल”, असे कुरैशी यांनी म्हटले आहे.