श्रीनगर : केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणावपुर्ण शांतता आहे. दरम्यान,राज्यात काही ठिकाणी संचारबंदी अजूनही कायम आहे. दरम्यान, आता जम्मूमधील शाळा व महाविद्यालये आजपासून सुरू होत आहेत. जम्मूमधून कलम 144 म्हणजेच जमावबंदीचे कलम हटवण्यात आले आहे. तसेच अद्यापही काही भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली आहे.
JAMMU: Schools have reopened in the city from today; visuals from Blooming Dale Public School and Sri Ranbir Model Higher Secondary School. #JammuAndKashmir pic.twitter.com/AIQYwmAGUB
— ANI (@ANI) August 10, 2019
बकरी ईदमुळे काश्मीरमधील निर्बंध काही प्रमाणातशिथील करण्यात आले होते. मात्र लोकांना वस्तीच्या जवळपास तसेच बाजारात जाण्याचीच परवानगी आहे. बाजार व दुकानेही सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी आहे. काश्मीर खोऱ्यात अद्याप सर्वत्र हाय ऍलर्ट असून, सगळीकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. उधमपूर व सांबा जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालये सुरू झाली. जम्मूतील शाळा सुरू झाल्या असल्या तरी काश्मीर खोऱ्यातील शाळा कधी सुरू होणार, हे स्पष्ट झालेले नाही. श्रीनगरची सर्वात मोठ्या जामा मशिदीची दारे अद्याप बंदच आहेत. केवळ लहान मशिदींमध्ये नमाज अदा करण्याची मुभा देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.