बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी
जामखेड (प्रतिनिधी) – सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेली एस.टी. बससेवा तातडीने सुरू करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने यापुढे व्यापक स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष ऍड. डॉ. अरुण जाधव यांनी दिला.
एस.टी. बस सह सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत कराव्यात, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड येथील एस.टी. बस डेपोसमोर डफली बजाव आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत, बापू ओहोळ, विकीभाऊ सदाफुले, पोपटराव फुले, विशाल पवार, अतिष पारवे, योगेश सदाफुले, अंकुश पवार, किरण जावळे, सुनिल साळवे, भीमराव चव्हाण, विशाल समुद्र, वैजिनाथ केसकर, संतोष चव्हाण, राकेश साळवे, रोहित भालेराव, अजिनाथ शिंदे, दादा गायकवाड, नानाभाऊ सावंत, बाबासाहेब चव्हाण, भीमराव चव्हाण, पप्पू सदाफुले, प्रेम आव्हाड, अमोल गायकवाड, लक्ष्मण सदाफुले आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकिभाऊ सदाफुले, अतिष पारवे, पोपटराव फुले, विशाल पवार, यांचीही भाषणे झाली. प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत यांनी निवेदनाचे वाचन केले. यावेळी एस.टी. डेपो समोर डफली वादन करण्यात आले. बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. अतिष पारवे यांनी आभार मानले. जामखेड एस.टी. डेपोचे मॅनेजर शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले.