जामखेड (प्रतिनिधी): कोरोना विषाणूंच्या वाढत्या घटना पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 7 वाजल्यापासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले. या काळात जास्तीत जास्त लोक घरात राहतील व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी याचा उपयोग होईल हा यामागचा हेतू होता आणि जामखेड शहरासह आसपासच्या खेड्यातील जनतेने यास चांगला प्रतिसाद दिला.
मात्र संध्याकाळी पाच वाजता जनतेने डॉक्टर, पोलिस, मीडिया कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, काम करणारे लोक अशा संकटकाळात मदत करणाऱ्या लोकांसाठी कृतज्ञता म्हणून, आपल्या खिडक्या आणि दाराजवळ उभे राहून टाळ्या वाजवण्यास सांगितले आहे. अशा आवाहनाला जामखेड शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी कोर्ट रोड येथे राहणाऱ्या दळवी कुटुंबातील अवघ्या 11 महिन्याच्या चिमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत टाळ्या व थाळी वाजवली. त्यानंतर या चिमुकलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.