मुंबई – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबई येथील वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा एजाज पटेल याने एका डावात 10 विकेट घेऊन भीम पराक्रम केला. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपल्या कामगिरीची चुनूक दाखवत न्यूझीलंडचा अख्खा संघ 62 तंबूत पाठवला. भारताकडे पहिल्या 263 धावांनी आघाडी आहे.
तत्पूर्वी कर्णधार विराट कोहली आने प्रथम फलंदाजी स्वीकारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र भारतीय सलामीवीर मयंक अग्रवाल याने कोहलीचा निर्णय योग्य ठरवत शानदार फलंदाजी केली. मयंकने 150 धावांची खेळी साकारली. तर शुभमन गिलने 44 धावा केल्या. दरम्यान अक्षर पटेल याने केलेल्या 52 धावांमुळे भारताला पहिल्या डावात 324 धावांची मजल मारता आली. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने एक डावात 10 विकेट घेतल्या.
प्रत्युत्तर न्यूजीलंडची सुरुवात अडखळत झाली. सलामी जोडी केवळ 15 धावांत तंबूत परतली. न्यूझीलंडकडून टॉम लेथम आणि काईल जेमीनसन या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यामुळे संपूर्ण संघ 28.1 षटकांत 62 धावांत गारद झाला.