औरंगाबाद : ‘एमआयआम’चे आमदार वारिस पठाण यांच्या वक्तव्याबाबत मोठा वाद होण्याची शक्यता आहे. या वक्तव्यामुळे शिवसेना,मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर एमआयआमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
”वारिस पठाण यांनी विधानाचा शब्दश: अर्थ घेण्याची गरज नाही. ज्यावेळी त्यांनी हे विधान केले त्यावेळी तिथे काही गैरमुस्लिमसुद्धा उपस्थित होते. सीएए, एनआरसीविरोधात त्यांनी मुस्लिम समाजातील संताप व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया जलील यांनी दिली.
दरम्यान शिवसेनेने वारिस पठाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत,’ अशा शब्दात पठाण यांच्यावर पलटवार केला आहे.
कर्नाटकातील बेळगाव इथे एका जाहीर सभेत बोलताना आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू असे वादग्रस्त विधान केले होते. १५ फेब्रुवारी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.