नवीदिल्ली – देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतरच्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला उद्देशून काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. यंदाचं वर्ष अमृतमोहत्सवी वर्ष असल्यामुळे पंतप्रधान नेमकं काय बोलणार याकडे देशासह विदेशातील लोकांचे देखील लक्ष लागलं होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मी जगभरातील भारतप्रेमींना, भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. तसेच केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात हा तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचं मोदी यांनी भाषणात म्हटलं आहे.
हर घर तिरंगाच्या माध्यमातून लोकांमध्ये नवी चेतना निर्माण झाली. देशामध्ये किती सामर्थ्य आहे हे तिरंगाच्या माध्यमातून जगाला समजले. भारत ही लोकशाहीची जननी असून देशाने ७५ वर्षात आपल्याजवळ मौल्यवान क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे. लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी देशाला “जय जवान,जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’चा नारा” दिला.
#WATCH PM Narendra Modi hoists the National Flag at Red Fort on the 76th Independence Day pic.twitter.com/VmOUDyf7Ho
— ANI (@ANI) August 15, 2022
‘जय जवान जय किसान’ हे लाल बहादूर शास्त्रीचें ब्रीद होते त्यावर जय विज्ञानची ताकद जोडत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी जय जवान जय किसानसह जय विज्ञान नारा दिला होता. त्यात आता पंतप्रधान मोदींनी जय अनुसंधानची भर घातली आहे.