नवी दिल्ली : देशात सध्याची परिस्थिती पाहता आपण सर्वांनी एकत्र येवून देशाला प्रगतिपथावर घेवून जाण्याची ही वेळ आहे, तसेच जातीधर्माच्या गोष्टी विसरून वैज्ञानिक प्रगती साधण्याची नितांत गरज आहे. असे मत माजी नौदल प्रमुख अरुण प्रकाश यांनी व्यक्त केले आहे. दिल्लीत आयोजित प्रेम भाटिया स्मृती व्याख्यानमालेत प्रकाश बोलत होते.
स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत आपण धार्मिक मतभेदाच्या वादात अडकून पडले आहोत त्यामुळेच आज आपण वैज्ञानिक प्रगती साधत नसल्याचीही खंत प्रकाश यांनी व्यक्त केली. आपण अजूनही मंदीर, मशिदीच्याच वादात अडकून पडलो आहोत तसेच यासाठी आपण आपली ऊर्जा खर्च करत आहोत हे न करता देशाच्या आणि आपल्या प्रगतीचे विषय हाताळणे गरजेचे असते. तिकडे चीन आर्टिफिशल इंटेलिजन्स, रोबोटिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये चीनने प्रगती केली आहे आणि आपण याच मुद्यांमध्ये अडकून पडल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.