मुंबई : फलंदाजी करताना उंचावरून फटके मारणे हा काही गुन्हा ठरत नाही. काहीवेळा सामन्यात अशी परिस्थिती येते की तुम्हाला अतिरिक्त जोखीम पत्करावीच लागते. त्यात गैर काहीच नाही, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. मुंबईतील त्याच्या क्रिकेट अकादमीतील युवा खेळाडूनां मार्गदर्शन करताना तो बोलत होता.
फलंदाजी करताना काही वेळा चुका होतात, त्यातूनच बोध घेतला पाहिजे. त्यामुळे या चुका पुन्हा होत नाहीत. तरूण खेळाडूंना मैदानावर त्यांचा नैसर्गिक खेळ करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे तरच त्याचा खेळ बहरेल, असेही रोहित शर्मा याने यावेळी सांगितले.