मुंबई – बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणाऱ्याने हा नको म्हणून त्याला निवडून द्या हे सांगण बरोबर नाही. एवढाच अभ्यास पक्षासाठी केला असता तर फायदा झाला असता. आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती, असा टोला शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना लगावला. शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. या हल्लाबोलचा तावडे यांनी समाचार केला.
तावडे म्हणाले, राज ठाकरे देश खड्ड्यात घालायला राहुल गांधींना द्या म्हणाले तो काय मनसे पक्ष आहे का?, स्वतःचं इंजिन बंद पडले आणि हे दुसऱ्यांना मदत करत आहेत. तसेच जे निरुपम राज ठाकरे यांना लुख्खा म्हणाले होते तेच आता मनसैनिकाना सांगणार निरुपम यांना मतदान करा. हा तर मनसैनिकांवर होणारा अन्याय असल्याचंही तावडे म्हणाले.
राहुल गांधी पंतप्रधान हवे का ते आधी शरद पवारांना विचारा, नाहीतर पुढच्या स्क्रिप्ट मिळणार नाही. तसेच मनसेने सभेत शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचा भाषणात उल्लेख केला नाही. यावर मला वाटत काही नाही. सभेतील भाषणाला राजकीय संदर्भ आहेत, जशी स्क्रिप्ट आली तसे ते बोलले असल्याचेही तावडे म्हणाले.
भारतात लोकशाही व मानवी हक्काची जपणूक नसती तर युनायटेड नेशन्स ह्युमन राइटस कौन्सिलच्या सर्वोच्च परिषदेवर सुमारे 193 देशांपैकी 188 देशांनी भारताला पाठिंबा देऊन निवडून दिले असते का? जगातील सर्व देश मूर्ख आणि तुम्हीच खरे आहात का?’, असेही ते म्हणाले.