नवी दिल्ली : येत्या 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात केंद्र सरकार 12 लाख कोटी रूपयांचे कर्ज घेणार आहे असे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले. म्हणजेच अर्थसंकल्पातील बऱ्याच तरतूदी पुर्ण करण्यासाठी आणि वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून पैसे उभारण्याचाही एक मार्ग पत्करला आहे. त्यासाठीच हे 12 लाख कोटी रूपयांचे कर्ज घेतले जाणार आहेत.
त्या म्हणाल्या की नवीन आर्थिक वर्षात सरकारचा एकूण खर्च 34 लाख 83 हजार कोटी रूपयांवर जाईल. सरकारकडे कर रूपात जो पैसा जमा होतो त्यातील 41 टक्के वाटा राज्यांना द्यावा लागतो. पंधराव्या वित्त आयोगानेच तशी शिफारस केली आहे. ती सरकारने मान्य केली आहे. विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी पायाभूत सुविधांमध्ये जादा विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.