मुंबई – आपल्या मोहक हास्याने आणि मार्मिक अभिनयाने एकेकाळी प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री जुही चावला. जुहीने आपल्या बॉलिवूड करियरची सुरुवात आपल्या दमदार अभिनयाने आपली एक वेगळी जागा सिनेसृष्टीमध्ये बनवली आहे.
अशातच जुहीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या बॉलिवूड करियरबाबत अनेक गौप्सस्फोट केले आहे.
जुही मुलाखतीत म्हणाली की, मी राजा हिंदुस्तानी आणि दिल तो पागल है हे चित्रपट नाकारल्यामुळे करिश्माला स्टारडम मिळाले. मी माझ्या इगोमुळे काही चित्रपट गमावले. मला त्याकाळात वाटत होते की, मी चित्रपटांमध्ये काम केले नाही तर इंडस्ट्रीला दुसरा पर्याय मिळणार नाही. मी माझ्या इगोमुळे अनेक चांगल्या संधी धुडकावल्या. मी ज्या लोकांसोबत कर्म्फटेबल आहे, त्यांच्यासोबतच मी त्यावेळी काम करत होते. तसेच मी कठीण भूमिका स्वीकारत नव्हते. याच कारणांमुळे मी काही चित्रपटांना नकार दिला.
जुहीने पुढे सांगितले की, राजा हिंदुस्तानी आणि दिल तो पागल है हे दोन्ही चित्रपट मी नाकारले. पण या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले. हे दोन्ही चित्रपट करिश्माला मिळाले आणि दिल तो पागल है या चित्रपटासाठी तर तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. असं देखील ती म्हणाली.