नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारी यंत्रणा या दिवस रात्र काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला असून आज त्याचा ९ वा दिवस आहे. त्याच पार्शवभूमीवर आज सकाळी मोदींनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले आहे. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असे मोदींनी म्हटले आहे. मोदींच्या याच आवाहनावर आता सर्व स्तरातून टीका करण्यास सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली असून नरेंद्र मोदी चूल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील असं वाटलं होतं असं म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून देशवासियांच्या हाती घोर निराशा आली आहे. वाटलं होतं चूल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील. पण त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला”.
9 बजे सुबह प्रधान मंत्री मोदी जीके भाषण से देश वासीयों के हात घोर निराशा ही लगी,
सोचा था चूल्हा जलाने की बात हो गी साहब दिया जलाने का उपदेश दे गए।— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 3, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी नऊ वाजता देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केले. तसेच एकत्र येऊन करोनाला हरवूयात असे आवाहनही केले. यावेळी बोलताना त्यांनी भारतीयांना पाच एप्रिल रोजी रात्री ९ वाजता देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असे मोदींनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या या आवाहनाला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रॉल करण्यास सुरुवात केली आहे.