वाघोली – तरुण पिढीमध्ये विविध कला कौशल्य असून त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांचा गुणगौरव करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अष्टापुर ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता जगताप यांनी केले.
माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप युवा मंच आयोजित व सरपंच कविता योगेश जगताप,युवा नेते योगेश अशोक जगताप यांनी आयोजित केलेल्या भव्य अशा गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस समारंभ अष्टापुर येथे संपन्न झाला त्यावेळी सरपंच कविता जगताप बोलत होत्या.
याप्रसंगी सरपंच कविता योगेश जगताप, उपसरपंच कालिदास कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, संजय कोतवाल, सुभाष कोतवाल, पुष्पा कोतवाल, अलका कोतवाल, महेश ढवळे, माजी सरपंच नितीन मेमाणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय कोतवाल, माजी उपसरपंच तयाजी जगताप, उद्योजक चंद्रकांत कोतवाल,
राहुल कोतवाल, अतुल कोतवाल, सुरेश कोतवाल, संजय कोतवाल, रामदास कोतवाल तसेच अष्टापुर मधील विविध बचत गटातील महिला यांच्या उपस्थित विजेत्या स्पर्धकांना एक सन्मानचिन्ह व रोख बक्षीस वरील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच नितीन मेमाणे म्हणाले की सरपंच कविता जगताप यांनी स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे विशेष करुन कौतुक केले तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय कोतवाल यांनी तरुण पिढीच्या कलागुणांचा गौरव केल्याबद्दल व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल यांनी केले.