मुंबई – राज्य सरकारने एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नेमणुकीसंदर्भात अर्ज मागवले होते. त्याची छाननी करून तीन नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता तो विषय सरकारकडे नव्हे, तर राज्यापालांकडे प्रलंबित आहे, अशी माहिती आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना नवाब मलिक म्हणाले, राज्य सरकारने 31 जुलैच्या तीन दिवस अगोदर या संदर्भात निर्णय करून तीन नावे निश्चित केली आणि ती अंतिम निर्णयासाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत.
अपेक्षा आहे की लवकरात लवकर राज्यपाल महोदय त्यावर स्वाक्षरी करून, ते शासनाला पाठवतील. जेणेकरून त्या नियुक्त्या होतील आणि व्यस्थितरित्या एमपीएससीचं कामकाज चालेल. त्यामुळे आता तो विषय सरकारकडे नाही राज्यापालांकडे प्रलंबित आहे, असे त्यांनी सांगितले.