नवी दिल्ली: देशाची स्थिती पूर्वपदावर आणण्याची वेळ आली असून त्यासाठी आणखी रेल्वे सोडल्या जातील, असे सांगत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे संकेत गुरूवारी दिले.
देशातील एक लाख 70 हजार तिकिट विक्री केंद्रांवर शुक्रवारपासून तिकिट विक्री सुरू करण्यात येईल, असे गोयल यांनी स्पष्ट केले. भारती रेल्वेच्या सर्व गाड्या 25 मार्च पासून बंद करण्यात आल्या होत्या. पॅसेंजर, मेल, आणि एक्सप्रेस रेल्वेच्या 200 गाड्या एक जूनपासून सुरू होणार आहेत.
या रेल्वे गाड्यातून प्रवासासाठी आचरसंहिता बनवली आहे. त्याच्या सहाय्याने करोनामुक्तय प्रवास शक्य करता येईल.
20 मे रोजी एका दिवसांत 279 श्रमिक एक्सप्रेस धावल्या. त्यातून पाच लाख विद्यार्ती आणि स्थलांतरीतांची वाहतूक करण्यात आली. . एक मे पासून सुमारे 25 लाख स्थलांतरीतांना त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे.
पियुष गोयल
रेल्वे मंत्री, भारत सरकार
तीन तासांत पावणे दोन लाख तिकिटांचे बुकिंग
या रेल्वेंसाठी गुरूवारी ऑनलाईन बुकिग सुरू झाले. त्यात पहिल्या तीन तासांत एक लाख 78 हजार तिकिटांचे बुकिंग झाले. या तिकिटांवर 76 रेल्वेमधून 4 लाख 23 हजार प्रवासी प्रवास करतील.