नागपूर: आज विधानसभेच्या सभागृहात अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करू नये अशी मागणी करताना सभागृहात विरोधकांनी जाणीवपूर्वक गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केल्यास सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या कायद्याविरोधात नागरिकांच्या तीव्र भावना असून या कायद्याविषयी सभागृहात मत मांडण्याची नैतिक जबाबदारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व आमदारांची आहे. त्यामुळे सभागृहात गोंधळ घालून आमची गळचेपी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कोणी करत असेल तरी आम्ही या कायद्याविरोधात चर्चा करत राहणार, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.