नवी दिल्ली – केंद्र सरकार राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्यासाठी अमलबजावणी संचालनालयासारख्या अर्थात ईडीसारख्या संस्थांचा वापर करत असल्याची टीका तृणमूल कॉंग्रेस पक्षाने केली आहे. त्याला भारतीय जनता पार्टीचे प. बंगालमधील खासदार दिलीप घोष यांनी उत्तर दिले असून पक्ष फोडणे किंवा स्थापन करणे हे ईडीचे काम नाही असे त्यांनी म्हटले आहे.
घोटाळे उघड करणे हे तपास संस्थेचे काम आहे. ते योग्य ठिकाणी योग्य मार्गाने गेले त्यामुळेच त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. जे लोक खोटे बोलत आहेत आणि ते लपविण्याचा प्रयत्न करत आहेत, ते लोकांना आता काय सांगणार? त्यांनी यासाठी या लोकांना मते दिली का, निवडणूक जिंकल्यावर तुम्ही 21 कोटींची लूट कराल, कोणी तुम्हाला हा अधिकार दिला असा सवाल घोष यांनी केला.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंहही राज्यसभेतून निलंबित
तृणमूलचे नेते पार्थ चॅटर्जी यांच्याशी संबंधित ठिकाणांवरून 21 कोटी रोकड जप्त करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अगोदर या प्रकरणात मौन बाळगणाऱ्या तृणमूलने आता केंद्रीय तपास संस्थांच्या दुरूपयोगाचे आरोप सुरू केले आहेत. त्याला घोष यांनी उत्तर दिले आहे.
राजस्थानात महाराष्ट्र पॅटर्न? आमदारांच्या नाराजीमुळे चर्चांना उधाण…