मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्या नुकतेच शाब्दिक युद्ध झाले. सोशल मिडीयावर याचे परिणाम मोठ्या प्रमाणात उमटले. अमृता फडणवीस यांनी अतिशय कणखर शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. तर आता पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना, ‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’ अशी घणाघाती टीका केली आहे.
Having a bad leader was not Maharashtra’s Fault – But Staying with one is ! जागो महाराष्ट्र ! https://t.co/uc9gmvVrNo
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 28, 2019
दरम्यान, अॅक्सिस बँकेमधील जवळपास दोन लाख पोलिस कर्मचाऱ्यांचे खाते एसबीआयमध्ये वर्ग करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तसेच अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेच्या पश्चिम भारताच्या उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट हेड आहेत. त्यामुळे हि माहिती समोर येताच अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
अमृता फडणवीस यांनी अर्थ संदर्भातील वृत्तपत्राच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले आहे की, ‘सरकारने विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत. अशाप्रकारे बँकेतील खाते वळवण्याचा निर्णय घेऊन सरकार मला आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहे,’ असा आरोप अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच, ‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’ असं ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.