वडूज येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा संवाद मेळावा उत्साहात
वडूज – माझ्या मंत्री पदाचा फायदा कार्यकर्त्यांनी जनतेसाठी करून राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची तळमळ दाखवली पाहिजे. सामान्य कार्यकर्त्याला सर्वात जास्त स्वाभिमान फक्त राष्ट्रीय समाज पक्षच देऊ शकतो. त्याबरोबरच संघटन मजबूत करणेही तितकेच महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. वडूज येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्याच्या सवांद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष श्रीकांत देवकर, जिल्हाध्यक्ष मामुशेठ विरकर, महिला अध्यक्ष पुजाताई घाडगे, नीलेश जाधव, मोहनदादा माने, दादासाहेब केसकर, भाऊसाहेब वाघ, काशिनाथ शेवते, बबनदादा विरकर, खंडेराव सरक, प्रमोद पवार, संदीप धुमाळ, प्रकाश खरात, रमाकांत साठे, सीमा बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री जानकर म्हणाले, जेंव्हा पक्ष 288 जागा लढवण्याची तयारी करेल व पक्षाची ताकद दिसल्यानंतरच मित्रपक्ष आपल्याला जास्त जागा देतील. यासाठी कार्यकर्त्यांनी संघटन करून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रवेश करून पक्षाच्या विविध आघाडीच्या माध्यमातून जनसामान्य माणसांची कामे करावीत. पक्ष मोठा होताना कष्ट घ्यावे लागतात. जेव्हा सामान्य कार्यकर्ते आमदार होतील तेव्हा तुम्हाला सन्मान मिळेल.
यावेळी नानासो घाडगे, शेखर खरात, निलेश लांडगे, डॉ शेंडगे, अंबिका पवार, स्वाती मगर, कविता खवळे, वैशाली विरकर, संगीता नरबर, शैलेंद्र भोईटे, उपस्थित होते.