लखनौ – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी सोनभद्रला भेट देऊन अत्याचार पीडित अदिवासींच्या कुटुंबियांची भेट घेतली त्याचे कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी स्वागत केले आहे. तथापी त्यावरून त्यांनी त्यांना हलका टोमणाही मारला आहे.
उशिरा का होईना एखाद्याला आपल्या कर्तव्याची जाणिव झाली हे चांगले झाले असे त्यांनी म्हटले आहे. अत्याचार पीडितांच्या बरोबर उभे राहणे हे सरकारचे कर्तव्यच असते असेही त्यांनी म्हटले आहे. उंभा गावातील दहा अदिवासांची गावच्या प्रमुखांनी गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
त्या अनुषंगाने प्रियांकांनी म्हटले आहे की उंभा गावच्या लोकांना न्याय मिळेल अशी आशा या भेटीमुळे निर्माण झाली आहे. त्यांच्या पाच प्रमुख मागण्या आहेत. त्या पुर्ण होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.