नवी दिल्ली : कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी शनिवारी उत्तर प्रदेशमधील कोरोनाव्हायरस तपासणी संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. सरकारने डेटा लपवून ठेवणे, सत्य लपविणे राज्यासाठी घातक सिद्ध होऊ शकत असं गांधी म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या. योगी सरकारने संपूर्ण परिस्थितीची योग्य माहिती द्यावी जेणेकरुन जनता आणि प्रशासन कोरोनाविरोधात एकत्रितपणे लढा देऊ शकेल. योगी सरकारने दोन दिवसापासून कोरोना चाचणी अहवाल देणे बंद केले आहे.
सरकारच्या या भूमिकेमुळे राज्यात भीती निर्माण झाली असून सरकारने आकडा सांगितला तर कोरोनाला आपण सहज पराभूत करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तपासणीबाबत पूर्ण पारदर्शकता असली पाहिजे जेणेकरून जनतेला माहिती मिळेल आणि समाज आणि प्रशासन या साथीच्या विरोधात एकत्रितपणे लढा देऊ शकेल. माहितीचा “डेटा आणि सत्य लपविण्यामुळे ही समस्या अधिक प्रमाणात घातक होईल.
यूपी सरकारने लवकरात लवकर हे समजून घेतले पाहिजे. हा डेटा जनतेसमोर ठेवणे महत्वाचे आहे, राज्यातील कोणत्या प्रयोगशाळांमध्ये, किती चाचण्या घेतल्या जातात, सर्व प्रयोगशाळांच्या दैनंदिन प्रयोगशाळेची क्षमता किती आहे, याची माहिती सरकारने जनतेला द्यावी. अशी मागणी त्यांनी केली.तसेच जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमांचे कटोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे गांधी म्हणाल्या.