मुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
@mybmc तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आधारित छायाचित्र प्रदर्शनास यावेळी भेट दिली. तसेच चैत्यभूमीवर तेवत असलेल्या भिमज्योतीचे दर्शन घेतले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे आणि लोकराज्यच्या विशेषांकाचे यासमयी प्रकाशन करण्यात आले. pic.twitter.com/lmkck0oFER
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 6, 2022
यावेळी ते बोलतांना म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला दिशा देण्याचं काम केलं आहे. संविधानामुळेच माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाला, असं म्हणत शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. ते पुढे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करतो. या महामानवामुळे आपण सगळ्या जगात ताठ मानेने उभे आहोत. डॉ. आंबेडकरांच्या घटनेने सगळ्यांना अधिकार दिले, जगण्याचे हक्क दिले. यामुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊन देशाची सेवा करू शकला. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती आज मुख्यमंत्री झाला आणि राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली ती बाबासाहेबांच्या संविधानामुळेच, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.