पवनानगर – गेल्या आठवड्याभरापासुन राज्यासह मावळ तालुक्यात अतिवृष्टी मुसळधार पाऊस पडतं आहे. या पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यातचं आज पहाटे साडेपाचच्या सुमारास मावळातील पवनमावळ परिसरातील काले-पवनानगर येथील विठ्ठल उर्फ बापु गणपत जगताप यांचे जोरदार पाऊसामुळे व मोठ्या प्रमाणात असलेल्या वार्यामुळे घर कोसळले आणिहोत्यचं नव्हतं झालं. आणि त्यात जीवा भावाच्या पिंट्या व बबड्या या दोन बैलाचां झाला मृत्यु
बापु जगताप यांची सर्व कुटुंबाची मिळुन ७ एकर शेती असुन त्यांनी ६ महिन्या पुर्वी शेतीची कामे करण्यासाठी दिड लाखाला हि बैल जोडी आणली होती.सहा महिन्यांन पासुन त्यांचे चागंले संगोपन केले होते.
नहेमी प्रमाणे सकाळी ते आपल्या बैलांना चारा घालण्यासाठी शेतावर असेलेल्या घरावर गेले असता त्यांना बैलांच्या अंगावर घर कोसळलेले दिसले.बैलांच्या अंगवार विटा,दगड,पत्रे पडुन बैल ढिगार्याखाली मृत पडल्याचे त्यांनी पाहिले आणी त्यांना अश्रु अनावर झाले.
काळ आला होता पन वेळ आली नव्हती
दरोरोज जेवन करुन बापु रात्री आपल्या शेतावरील घरावर झोपायला जायचे. मात्र काल पाऊस जास्त असल्याने बापु सुदैवाने मात्र काल झोपायला गेले नाही. त्यामुळे त्यांचा जीव वाचला अनथ्या मोठी दुदैवी घटना घडली असती. तसेच आजुन काही जनावरे त्यांनी रानात सोडल्यामुळे वाचली आहे. काळ आला होता पन वेळ आली नव्हती हेचं म्हणावे लागेल.
जगताप यांचे घर व बैल यांचे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्याचे पंचनामे करुन भरपाई द्यावी अशी मागणी नागरीक करतं आहे. त्यांच्या बैलांचा मृत्यु झाल्याचे समजल्याने शेतकर्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
– विठ्ठल (बापु) जगताप
६ महिन्यापुर्वी आणलेली बैले या अतिवृष्टी पाऊसामुळे रात्री घर पडुन मृत्यु झाला आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.माझ्या जीवा भावाची वासरे गेली आहे.मला असं वाटतं की माझी दोन मुलेचं गेली आहे.