मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरीना ही जोडी पाच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. यात दोघांचा तरुणपणापासून तर वयोवृद्धचा जीवन प्रवास दाखविण्यात आला आहे. तसेच ‘भारत’ सिनेमातलं गाणं ‘इश्क दी चाशनी’ रिलीज झालं आहे. विशाल- शेखरचं संगीत असलेल्या या गाण्याला अभिजीत श्रीवास्तवने आपला आवाज दिला आहे.
‘भारत’ या चित्रपटात सलमान खान मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासह कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, नोरा फतेही, सुनील ग्रोवरही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर तर निर्मिती अतुल अग्निहोत्री करत आहे. नेहमीप्रमाणे सलमान खानचा हाही चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.