नवी दिल्ली –भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. मुश्ताक अली स्पर्धेसाठी दिल्लीच्या संघात त्याची निवड करण्यात आली असून संघाचे नेतृत्त्व भारताचा सलामीवीर शिखर धवन याच्याकडे सोपविण्यात आले आहे.
करोना महामारीमुळे लांबलेल्या भारतातील देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेने होते आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेला वेगवान गोलंदाज इशांत शर्माचाही दिल्लीच्या 42 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.
इशांतला पुनरागमनाच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्वाची असून फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असल्याने त्यासाठी तयारी करायला ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे.