नवी दिल्ली – भारतीय संघाचे माजी कर्णधार सबा करीम यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य यष्टीरक्षक इशान किशन आणि रिषभ पंत या दोन नवोदित खेळाडू संबंधित आहे. सबा करीम म्हणाले, यष्टीरक्षक इशान किशन आणि रिषभ पंत हे दोन युवा खेळाडू भविष्यात भारतीय संघाचे तिन्ही प्रकारात प्रतिनिधित्व करतील. त्यांना वाटते की हे दोन खेळाडू मॅच विनर आहेत.
सबा करीम म्हणाले, “दोन्ही ही फलंदाजांनी नेहमीच स्वतःला मॅच विनर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वात पहिल्यांदा रिषभ पंतने स्वतःला सिद्ध केले. परंतु आता इशान किशनला संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याचे सुद्धा मनोधैर्य हेच असणार आहे. माझ्या हिशोबाने भारतीय संघ भाग्यशाली आहे की, त्यांच्याकडे मर्यादित षटकांच्या फॉरमॅट मध्ये रिषभ पंत आणि इशान किशन सारखे मॅच विनर खेळाडू आहेत.
मला पूर्ण विश्वास आहे की, भविष्यात पंत आणि किशन भारतासाठी तिन्ही प्रकारात खेळतील. ”
सबा करीम यांच्या मते रिषभ पंतरिषभ पंत आणि इशान किशन यांना 19 वर्षांखालील स्तरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खूप अनुभव आहे. हे दोन्ही खेळाडू 2016 साली झालेल्या 19 वर्षांखालील भारतीय संघाचे भाग होते. त्याचा फायदा आता त्यांना होत आहे.
सबा करीम म्हणाले,” रिषभ पंत आणि इशान किशन या दोघांनी 19 वर्षांखालील भारतीय संघाचे विश्वचषक स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या दोघांचा पाया मजबूत आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटमध्ये त्यांची जबाबदारी काय हे त्यांना माहीत आहे. त्याचबरोबर हे सुद्धा माहित आहे की स्वतःला कस सिद्ध करायच.”
जेव्हा भारताचा 19 वर्षांखालील संघ 2016 विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहचला होता. तेव्हा या भारतीय संघाचे नेतृत्व इशान किशनने केले होते. मात्र अंतिम सामन्यात त्यांना वेस्ट इंडिज संघाकडून पराभव स्विकारावा लागला होता.