मुंबई – पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदू काय रस्त्यावर पडला आहे ? ठाकरे सरकारला लाज वाटली पाहिजे, शरजिल उस्मानी प्रकरणावर फडणवीसांचा संताप व्यक्त केला आहे. शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक झाली आहे. आता याच मुद्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनीही मुंबईतील पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे .
आशिष शेलार म्हणाले,’ शिवसेनेने हिंदूना सडलेला म्हणणाऱ्या शरजीलला पळून जाण्यात मदत केली आहे. भाजपाने दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करु हे म्हणणाऱ्या शिवसेनेनच शरजिल उस्मानी वाचवण्याचं काम केलं हे स्पष्ट होते.”
ते पुढे म्हणाले,’शरजील उस्मानी केलेल्या वादग्रस्त विधानाची तुलना जर इतर प्रकरणाशी होणार असेल तर ठाकरे सरकारला डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. तो जर मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर गेला असेल तर ? त्याला ही मदत करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आहे. हे त्यांचं पाप आहे,” असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकार आरोप लगावला आहे.