मुंबई – राज्य सध्या करोनाची लढाई लढत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत खलबत सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. कॉंग्रेसने विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन 1 वर्ष सात महिने झाले असताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. इतकंच नाही तर हायकमांडने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर स्वीकारेन असेही सूतोवाच केले. यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहे. त्यांचा या विधानावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण पाठराखण केली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले,’महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालविणे हे आमच्या सरकारचे पहिले प्राधान्य आहे. तसेच महाराष्ट्रात भाजप सरकार येऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकार कडून जाणीवपूर्वक प्रयोग केले जात आहे. ‘
ते पुढे म्हणाले,’प्रत्येक पक्षातील नेत्यांना आपला पक्ष वाढावा असा विचार करणं स्वाभाविक आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी काही दिवसांनी पूर्वी केलेल्या राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन 1 वर्ष सात महिने झाले असताना स्वबळाचा नारा दिला आहे. इतकंच नाही तर हायकमांडने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर स्वीकारेन असेही सूतोवाच केले. त्यांच्या या भूमिकेकडे त्याच नजरेतून बघितले पाहिजे, त्यातून वेगळे अर्थ काढणे चुकीचे आहे.
येत्या निवडणुकीत जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री होईल, असं म्हटल्यास चुकीचे काय?’ असा प्रश्न विचारत त्यांनी अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांची पाठराखण केली आहे.