मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेटीवर राजकीय वर्तुळात विविध आडाखे बांधले जात आहेत. यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दोन पक्षांचे बडे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होतेच, असे विधान केले होते. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयके, जम्मू काश्मीर, चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Is it a sin to discuss politics? If two political leaders meet they discuss issues related to the country, farm bills, Jammu and Kashmir, China, Pakistan, COVID-19: Sanjay Raut, Shiv Sena https://t.co/JeGLthXGEi pic.twitter.com/G0VohEBHm8
— ANI (@ANI) September 29, 2020
तसेच, चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता असल्याचेही म्हंटले होते. यावर राजभवनात जाऊन सांगावे लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगवला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याने महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले होते. पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चतता असते. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचेच जुळले नाही, तर काहीही पर्याय उरणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते.