मुंबई – बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे, असे विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर आता मविआ सरकारकडून खोचक टीका केली जात आहे. तसेच महाराष्ट्रातील नागरिकांनीही संताप व्यक्त केलाय.
कर्नाटकच्या मा उपमुख्यमंत्री यांचं वक्तव्य बालिशपणाच आहे.. कर्नाटक मधील मराठी बांधवाना वेठीस धरण्यापेक्षा त्यांना न्याय द्या..आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी सिमभागाबाबत तसेच कर्नाटक उपमुख्यमंत्री यांच्या वक्तव्याबाबत ची भूमिका स्पष्ट करावी.
— Uday Samant (@samant_uday) January 29, 2021
आता, मंत्री उदय सामंत यांनीही यासंदर्भात भाजपा नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलीय. त्यांनी ट्विट केले आहे की,’कर्नाटकच्या मा उपमुख्यमंत्री यांचं वक्तव्य बालिशपणाच आहे.. कर्नाटक मधील मराठी बांधवाना वेठीस धरण्यापेक्षा त्यांना न्याय द्या..आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी सिमभागाबाबत तसेच कर्नाटक उपमुख्यमंत्री यांच्या वक्तव्याबाबत ची भूमिका स्पष्ट करावी.’ असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील भाजप पक्षाला यावरून टोला लगावला आहे.
दरम्यान, मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समितीची एक बैठक पार पडली होती. कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्व पक्षीयांनी एकजुटीने व आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.