मुंबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण याने शनिवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती स्विकारण्याची घोषणा केली. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दुखापतीमुळे त्याला क्षमता सिध्द करता आली नाही.
1️⃣7️⃣3️⃣ international appearances
2️⃣8️⃣2️⃣1️⃣ runs
3️⃣0️⃣1️⃣ wickets@T20WorldCup winner 🏆Irfan Pathan has announced his retirement from professional cricket 🇮🇳 pic.twitter.com/2bLC98eRif
— ICC (@ICC) January 4, 2020
३५ वर्षीय इरफानने गेल्या फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या सईद मुश्ताक अली ट्राफी स्पर्धेत जम्मू-काश्मीरचे नेतृत्व केले होते. तोच त्याचा अखेरचा सामना ठरला. गेले वर्षभर तो क्रिकेटपासून दूर आहे. यदा त्याने आयपीएल साठीही नाव दिले नाही.
Test hat-trick ✅
T20I World Championship triumph ✅
Over 300 wickets in international cricket ✅We wish @IrfanPathan well as he retires from all forms of cricket. pic.twitter.com/tkhwt2YxWc
— BCCI (@BCCI) January 4, 2020
इरफान या डावखु-या वेगवान गोलंदाजाने २००३ साली आॅस्ट्रेलियाविरूध्द अॅडिलेड ओव्हलवर भारतातर्फे पदार्पण केले होते. उजव्या हाताच्या फलंदाजांविरूध्द स्विंग करण्याची नैसर्गिक क्षमता ही त्याची खासियत होती. विश्वचषक टी-२० स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणा-या भारतीय संघाचा तो सदस्य होता. पाकिस्तानविरूध्द २००६ मध्ये हरभजन सिंगनंतर कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज होता.
भारतातर्फे आॅक्टोबर २०१२ मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला. त्याने २९ कसोटी सामन्यांत ११०५ धावा केल्या आहेत आणि १०० बळी घेतले आहेत. इरफानने १२० एकदिवसीय सामन्यात १५४४ धावा केल्या आणि १७३ बळी घेतले आहेत. त्याने २४ टी-२० सामने खेळले आहेत, यात फलंदाजीत १७२ धावा तर गोलंदाजीत २८ बळी घेतले आहेत.