मुंबई – लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल याच्या फलंदाजीचे कौतुक विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी केले आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत लखनौचे नेतृत्व करताना राहुलने जवळपास प्रत्येक सामन्यांत एक फलंदाज म्हणून किंवा एक कर्णधार म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पेलली आहे.
त्याची फलंदाजी एकदम तंत्रशुद्ध आहे, त्यात खोटेपणा नाही. त्याचे शॉट सिलेक्शनही कौतुकास्पद आहे. खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी तो काही वेळ घेत असला तरीही त्यानंतर त्याची फलंदाजी आक्रमक होते. त्याचे नेतृत्वही यशस्वी होत आहे. समोरच्या संघातील खेळाडूंचे कमकुवत दुवे हेरुन त्यानूसार गोलंदाजांकडून तसेच फलंदाजांकडून सरस कामगिरी करुन घेण्यात तो यशस्वी होत आहे, असेही गावसकर म्हणाले.