दुबई – आयपीएल स्पर्धेला प्रारंभ झाल्यापासून रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याला येत असलेले अपयश चर्चेचा विषय बनले आहे. त्यावरून विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी केलेल्या टीकेमुळे निर्माण झालेले वादळ काहीसे संपले असले तरी कोहलीचे अपयश काही त्याची पाठ सोडत नसल्याचे याही सामन्यात पुन्हा एकदा सिद्ध झाले.
या स्पर्धेत त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत त्याने अनुक्रमे 14, 1 व 3 अशा धावा केल्या आहेत. आयपीएल स्पर्धेत कोहलीची भरीव कामगिरी झाली तरच त्याच्या संघाला विजयाची संधी असेल. तसेच त्याच्यावरील टीकेलाही पूर्णविराम मिळेल.