दुबई – पंच नितीन मेनन यांनी दिलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका रविवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला बसला. पंचांनी आयपीएल स्पर्धेत एखाद्या निर्णयाबाबत खात्री नसेल तर तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी, असे स्पष्ट संकेत असूनही मेनन यांनी हा कॉल घेतला नाही. त्यामुळे हा सामना टाय झाला व सुपर ओव्हरमध्ये निकाली ठरला.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पंजाबला विजयासाठी 10 चेंडूंत 21 धावांची गरज होती. त्यावेळी कगिसो रबाडाच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मयंक आग्रवालने चेंडू मिडऑनला फटकावला व ख्रिस जॉर्डनच्या साथीत दोन धावा घेतल्या होत्या. मात्र, स्क्वेअर लेगला उभे असलेल्या पंच मेनन यांनी एक धाव शॉर्ट दिली.
आग्रवालची जिद्दी खेळीही ठरली व्यर्थ
संघ मालकांची पंचावर टीका
तिसऱ्या पंचाची मदत नाकारली
बीसीसीआयला आवाहन
नियम स्पष्ट करण्याची मागणी
सामनाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आवश्यक
जॉर्डनने पहिली धाव घेताना बॅट क्रीझला लावली नाही त्यामुळे हा कॉल दिला गेला. मात्र, रिप्लेमध्ये ही धाव पूर्ण असल्याचे स्पष्ट झाले पण तोवर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागलेला होता. ती धाव जर ग्राह्य धरली असती तर पंजाबचा विजय 20 षटकांतच झाला असता व सामना सुपर ओव्हरमध्ये गेलाच नसता.
दिल्लीच्या 157 धावसंख्येचा पाठलाग करताना आग्रवालने 60 चेंडूंत 89 धावांची खेळी केली. मात्र, विजयासमीप असताना तो बाद झाला व सामना दिल्लीच्या बाजूने फिरला. सामना टाय झाल्याने सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. मात्र, आग्रवालची खेळी व्यर्थ ठरली आणि पंचानी दिलेल्या चुकीच्या कॉलमुळे पंजाबला हातात असलेला सामना गमवावा लागला.