दुबई – आयपीएल स्पर्धेत आज बलाढ्य मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वपूर्ण सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत पाचवे विजेतेपद साकार करण्यासाठी रोहित शर्मा आणि कंपनी तर, पहिल्याच विजेतेपदासाठी श्रेयस अय्यर सज्ज झाले आहेत.
या महत्त्वपूर्ण अशा लढतीस थोड्या वेळातच सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
UAE: #DelhiCapitals captain Shreyas Iyer wins the toss & elects to bat first against #MumbaiIndians in the #IPL2020 Final being played at Dubai International Cricket Stadium tonight.
This is the 5th IPL Final for Mumbai Indians while it’s first IPL final for Delhi Capitals. pic.twitter.com/UqMRfINqWF
— ANI (@ANI) November 10, 2020
दरम्यान, यंदाच्या स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबईने 14 सामने खेळताना 9 विजयांची नोंद केली. त्यांना 5 सामने गमवावे लागले असले तरीही त्यांनी गुणतालिकेत पहिले स्थान मिळवताना थाटात अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे सुरुवातीचे काही सामने जिंकत गुणतालिकेत अग्रस्थान मिळालेल्या दिल्लीला नंतरचे सामने गमावल्याने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणेही कठीण बनले होते. मात्र, त्यांनी सातत्याने सरस कामगिरी करत अखेर अंतिम फेरी गाठली.