दुबई – दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या क्वॉलिफायर सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट याला दुखापत झाली असली तरीही तो 10 नोव्हेंबरला होत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पूर्ण तंदुरुस्त ठरेल, असा विश्वास मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केला आहे.
क्वॉलिफायरच्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा 57 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. याच सामन्यात पहिली दोन षटके गोलंदाजी केल्यानंतर बोल्टने नंतर गोलंदाजी केली नव्हती. त्यावेळी त्याच्या पायाचे स्नायू दुखावले गेले होते. अंतिम सामन्याला अद्याप चार दिवसांचा अवधी असून या काळात बोल्ट निश्चितच तंदुरुस्त ठरेल, असेही रोहितने सांगितले.