मुंबई – अमिरातीत होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत करोनाबाबत नवे नियम तयार केले असून त्यातील जैव सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे खेळाडूंनी तसेच स्पर्धेशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने या नियमाचा भंग केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
स्पर्धेत सहभागी होत असलेले 8 संघ व त्यासंबंधित सर्व व्यक्तींची करोना चाचणी केली जाणार असून त्याचे अहवाल सातत्याने तपासले जाणार आहेत. तसेच या सर्व घटकांना नव्या नियमांची पूर्वकल्पना दिली जाणार आहे. त्यानंतरही कोणी या नियमांचे पालन केले नाही तर मात्र, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.