मुंबई – आयपीएल स्पर्धेतून करारबद्ध झाल्यानंतरही काही कारणे देत अनेकदा खेळाडू माघार घेतात. मात्र, आता त्यावर नियंत्रण आणले जाणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. कोणत्याही वैध कारणाशिवाय खेळाडूंनी आयपीएलमधून बाहेर पडू नये किंवा ते स्पर्धेतून वगळले जाऊ नये यासाठी नवीन नियम, धोरण व कारवाईचा आराखडा बीसीसीआय तयार करत आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या मोसमातून विविघ संघांतीलकाही खेळाडूंनी विविध कारणे देत माघार घेतल्यावर संघ मालकांनी चिंता व्यक्त करताना बीसीसीआयकडे नारीजी व्यक्त केली होती. त्यामुळेच आता बीसीसीआय याबाबत ठोस आराखडा तयार करत आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून जेव्हा लिलावात खेळाडूंना कमी रक्कम मिळते, तेव्हा त्यांचा स्पर्धेतून बाहेर पडण्याचा विचार सुरु होतो. इंग्लंडच्या जेसन रॉय आणि ऍलेक्स हेल्स यांनीही याच कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतल्याचे मानले जात आहे. या दोन्ही खेळाडूंना लिलावात त्यांच्या बेस प्राईसमध्येच खरेदी करण्यात आले. त्यानंतररॉय वहेल्स यांनी बायोबबलमुळे मानसिकता खालावल्याचे कारण देत माघार घेतली. या दोघांनाही लिलावापूर्वीच आयपीएलचे वेळापत्रक आणि बायोबबलची संपूर्ण माहिती होती. तरीही त्यांनी लिलावानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
या स्पर्धे प्रत्येक संघाचे मालक एक महत्त्वाचा भाग आहेत. ते कोणत्या ना कोणत्या खेळाडूंवर पैसे लावतात. जर एखादा खेळाडू कुठलेही कारण देऊन बाहेर पडला तर संघांच्या योजना धुळीला मिळतात. न पटणारी कारणे देत स्पर्धेतून बाहेर पडणाऱ्या खेळाडूंना वॉच लिस्टमध्ये टाकले जाणार आहे.
नव्या नियमानूसार तसेच आराखड्यानूसार आयपीएलमधून माघार घेणाऱ्या खेळाडूंवर काही वर्षांसाठी स्पर्धेत खेळण्यास मनाई केली जाणार आहे. प्रत्येक खेळाडूची कारणे वेगळी असतील व त्यानूसार सर्व गोष्टींची माहिती घेऊन ही कारणे योग्य आहेत का ते पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे संकेतही बीसीसीआयने दिले आहेत.
दुखापत किंवा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची कारणे योग्य मानली जातील मात्र, अन्य कारणे दिलेल्या खेळाडूंना या नियमांचा फका बसू शकतो मात्र, या नियमांमुळे खेळाडूंचे स्पर्धेतून माघार घेणे कमी होणार आहे.