मुंबई – इंडियन प्रीमियर लीग 2021 क्रिकेट स्पर्धेत आज रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैद्राबादविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीला निर्णय घेतला. पहिला सामना गमावणाऱ्या मुंबईने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे.
सामन्यात मुंबईचेच पारडे जड राहणार यात शंका नाही. कोलकाताने मुंबईला अवघ्या 152 धावावंर रोखले होते. तसेच कोलकाताच्या नितीश राणाने हल्ला चढवत मुंबईचा पराभव होणार हेच दाखवले होते. मात्र, रोहितने गोलंदाजीत केलेले बदल व गोलंदाजांनीही केलेली अविश्वसनीय कामगिरी यांच्या जोरावर मुंबईने कोलकाताच्या तोंडचाच घास पळवला व विजय मिळवला होता.
दुसरीकडे कर्णधार डेविड वॉर्नर याच्यावरच हैद्राबादची फलंदाजी अवलंबून राहणार आहे. संघात नावाजलेले फलंदाज असले तरीही त्यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याने हैदराबादला गेल्या स्पर्धेतही हातातोंडाशी आलेल्या विजयांनी हुलकावणी दिली आहे.