चेन्नई – अष्टपैलू आंद्रे रसेलचे पाच बळी आणि इतर गोलंदाजांनी त्याला दिलेली सुरेख साथ यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला १५२ धावांत रोखलं.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या मुंबई संघाला निर्धारित २० षटकांत सर्वबाद १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली. सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. त्याने ३६ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. तर रोहित शर्माने ४३ धावा केल्या. तसेच हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. मात्र मुंबईच्या इतर खेळाडूंना प्रभावी कामगिरी करण्यात अपय़श आलं.
कोलकाताकडून रसेलने दोन षटकांत पाच बळी घेतले. तर पॅट कमिन्सने दोन आणि वरुण चक्रवर्ती, शकीब अल हसन आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.