मुंबई – रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण या आठवड्यात जाहीर होणार आहे. पतधोरण जैसे थे असण्याची शक्यता असली तरी गुंतवणूकदारांचे पतधोरणाकडे लक्ष राहील.
सरलेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,457 अंकांनी म्हणजे 3.83 टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे सर्वात मोठ्या दहापैकी आठ कंपन्यांचे बाजारमूल्य 1.57 लाख कोटी रुपयांनी कमी झाले.
सरलेल्या आठवड्यात फक्त इन्फोसिस आणि एचसीएल या कंपन्यांचे बाजार मूल्य वाढले. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेलला विक्रीचा फटका बसला.