मागील लेखात गुंतवणुकीचा चांगला पोर्टफोलिओ बनवण्यासाठी कांही कंपन्या सुचवलेल्या होत्या व जाता जाता आपल्या पोर्टफोलिओच्या पुनर्संतुलनाविषयीदेखील लिहिलं होतं. आज त्याच गोष्टीचा आढावा घेऊयात कारण जशा योग्य कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असाव्यात म्हणून आपण अट्टाहास धरतो तितकाच अट्टाहास आपण योग्य मालमत्ता विभागणी, पोर्टफोलिओचं ‘पद्धतशीर’ व नियमित पुनर्संतुलन, पोर्टफोलिओची रचना किंवा शिस्तबद्ध आखणी या गोष्टींबाबत कधीच करताना दिसत नाही अथवा या गोष्टींना गांभीर्यानं कधीच घेतलं जात नाही. परंतु जितकं महत्त्व योग्य कंपन्या निवडीला आहे, तितकंच महत्त्व हे पोर्टफोलिओच्या मालमत्ता विभागणीस व पुनर्संतुलनास आहे. आता मालमत्ता विभागणी म्हणजेच
सेट लॉकेशन म्हणजे नक्की काय ? ऊे पीें र्िीीं रश्रश्रर् ूीीे शससी ळपीें ीळपसश्रश लरीज्ञशीं, म्हणजेच आपली सर्वच्या सर्व गुंतवणूक एकाच विशिष्ट पर्यायात न गुंतवता उपलब्ध अशा वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणे. आपल्या कुवतीनुसार व आपल्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसार ह्या विभागणीची – अधिक जोखीम असलेली गुंतवणूक ते कमी जोखमीची गुंतवणूक, जी आपल्याला आवश्यक असलेल्या कालावधीत ठराविक परतावा देऊ शकेल अशी वर्गवारी करता येऊ शकते, यालाच म्हणतात सेट लॉकेशन. पुढं जाण्याआधी एक लक्षात घ्यावं की, ज्या पर्यायांमधून आपणांस काहीतरी परतावा अपेक्षित असतो त्यांनाच गुंतवणूक पर्याय म्हणता येईल.
यांमध्ये ढोबळमानानं शेअर्स, म्युच्युअल फंड हे गुंतवणूक पर्याय जास्त जोखीम असलेले परंतु सर्वांत जास्त परतावा देऊ शकणारे पर्याय म्हणून विचारात घेतले जातात. स्थिर उत्पन्न देणारे पर्याय उदा. बॅंक मुदत ठेवी, पोस्टाच्या विविध योजना, रिकरिंग डिपॉझिट्स, बचत पत्र, कर्जरोखे, ऋणपत्र, पब्लिक प्रॉव्हीडंट फंड – भविष्य निर्वाह निधी, इ. पारंपरिक पर्याय आहेतच व आता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अत्यंत कमी जोखमीचे असेच म्हणजे एसआयपी, डेब्ट फंड हे पर्याय उपलब्ध आहेत. तसंच बचत खात्यातील रक्कम किंवा लिक्विड फंड हे गुंतवणूक पर्याय अधिक तरल म्हणजे जे कधीही विकून लागलीच त्यातून केलेली गुंतवणूक काढता येऊ शकते असे पर्याय म्हणून विचारांत घेता येऊ शकतात तर स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक ही त्यामानानं रोकडदुर्लभ (ळश्रश्रळर्िींळव) समजली जाते कारण विकण्यासाठी लागणारा वेळ व अनिश्चितता.
मौल्यवान धातू म्हणजे सोनं व चांदी यां गोष्टी खरंतर गुंतवणूक पर्याय म्हणून अयोग्यच आहेत परंतु अनेक हौशी लोक भावनेच्या भरात समाधानासाठी यामध्ये देखील गुंतवणूक करतात. सर्वसाधारणपणे बाजारात अनिश्चितता किंवा भीतीचं वातावरण (उदा. जागतिक मंदी, युद्ध, अतिरेकी हल्ले, इ.) असेल तर इतर पर्यायातील जोखीम कमी करण्यासाठी जागतिक बाजारात सोन्यावर जास्त भरंवसा दाखवला जातो व अशा काळात सोन्याचे भाव वाढू शकतात, हेही तेवढेच खरे.
आता ही वर्गवारी अधिक परतावा – अधिक जोखमीच्या पर्यायापासून ते कमी ते नगण्य जोखमीच्या पर्यायापर्यंत कशाच्या आधारावर करायची? हे काम आपले आर्थिक सल्लागार अत्यंत चोखपणे पार पाडत असतात, तोच आपल्या कुटुंबाच्या पुढील काळातील गरजा लक्षात ठेवून त्याप्रमाणं आपल्या पैशाचं, गुंतवणुकीचं व संपत्तीचं आर्थिक नियोजन करत असतो.
उदा. 30 वयाच्या व्यक्तीस पाहिलं अपत्य झाल्यास त्यास सतरा वर्षानंतर चाळीस लाख रुपये हवे असल्यास त्या व्यक्तीनं आजपासून दरमहा 5000 रुपये हे अशा सेट क्लास म्हणजेच अशा गुंतवणूक प्रकारात गुंतवले पाहिजेत की, त्यातून अमूक एक टक्के दरवर्षी परतावा गृहीत धरल्यास वरील रक्कम जमा होईल. हे झालं ध्येय समोर ठेऊन केलेलं आर्थिक नियोजन (ेरश्र लरीशव ऋळपरपलळरश्र झश्ररपपळपस). त्यासाठी आयुष्याच्या कोणत्या वळणावर गुंतवणूक करताना किती जोखीम घ्यायची ? तर सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की, 100 वजा तुमचं वय व आलेल्या उत्तराइतकी टक्के गुंतवणूक ही इक्विटी मार्केटमध्ये असावी.
पोर्टफोलिओ पुनर्संतुलन : यामध्ये प्रामुख्यानं दोन प्रकार येतात ते म्हणजे, समजा इक्विटी व डेब्ट या दोन प्रमुख सेटक्लासमध्ये 70:30 या गुणोत्तरात गुंतवणूक केली असल्यास प्रथम कमीतकमी वर्षातून एकदा तरी इक्विटी विभागातील गुंतवणूक केलेल्या कंपन्या अथवा म्युच्युअल फंड यांची तपासणी करून त्यातून नको असलेले अथवा नफा काढून घेण्यासाठी काही शेअर्स विकणं, आणि झालेल्या नफ्यामधून कांही रक्कम दुसऱ्या कंपनीत अथवा दुसऱ्या फंडात अशाप्रकारे गुंतवणं की प्रतिवर्षी ठरवलेला अपेक्षित परताव्याचा दर साध्य व्हावा. हे पुनर्रसंतुलन तेंव्हाच करा जेव्हा तुम्हाला वाटेल की, केलेली विभागणी आपल्या अपेक्षेपेक्षा फारच दूर आहे.
आता दुसरा प्रकार म्हणजे काटेकोरपणे आपला संपूर्ण पोर्टफोलिओ हा 70:30 या प्रमाणात पुनर्संतुलित करावा. म्हणजे उदाहरणार्थ, सुरुवातीस 1 लाख रु. गुंतवणूक 70% इक्विटी व 30% डेब्ट या प्रकारात केली असल्यास व तेच प्रमाण कायम ठेवायचे ठरवले असल्यास एक वर्षानंतर समजा इक्विटीमधील गुंतवणुकीवर 15% परतावा (रु. 10500) मिळालेला असल्यास व डेब्ट प्रकारानं 9% परतावा (रु. 2700) दिला असल्यास दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीस (1,00,000+10,500+2,700) = 1,13,200 रुपये होतील तर त्यावेळेस पुन्हा 79,240 रु. पुन्हा इक्विटी प्रकारात व उरलेले 33,960 रु. डेब्ट प्रकारात गुंतवावेत, व ही क्रिया दरवर्षी पाळावी. ही पुनर्संतुलनाची वेळ साधारणपणे वर्षातून एकदा असावी व तो दिनांक देखील स्वतःचा/ जोडीदाराचा/ अपत्याचा/ पालकाचा जन्मदिन अथवा लग्नाचा वाढदिवस किंवा कोणताही लक्षात राहू शकणारा दिवस असावा.