नवी दिल्ली – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्णत्वास जाणार आहे. निवडणुकीतील अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी देशभरातील लोकसभेच्या 59 जागांसाठी मतदान होत आहे.
अंतिम टप्प्यातील मतदानामध्ये पंजाबमधील सर्व 13 जागांसाठी मतदान होत आहे. त्याशिवाय, उत्तरप्रदेश (13 जागा), पश्चिम बंगाल (9 जागा), बिहार आणि मध्य प्रदेश (प्रत्येकी 8 जागा), हिमाचल प्रदेश (4 जागा), झारखंडमध्ये (3 जागा) मतदान होत आहे. चंडीगढमधील एकमेव जागेसाठीही मतदार त्यांचा हक्क बजावतील.
लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत असून दुपारी 12.30 वाजेपर्यंत सरासरी एकूण 25.54 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.
दुपारी 12.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
बिहार – 18.90 %
हिमाचल प्रदेश – 27.98 %
मध्यप्रदेश – 29.48 %
पंजाब – 23.45 %
उत्तर प्रदेष – 23.16 %
पश्चिम बंगाल – 32.53 %
झारखंड – 31.39 %
चंडीगढ – 22.30 %
दरम्यान, सातव्या टप्प्यात रिंगणात असलेल्या 918 उमेदवारांचे भवितव्य 10 कोटींहून अधिक मतदार ठरवतील. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे.