नवी दिल्ली – आपल्या सरकारने सादर केलेल्या प्रत्येक अर्थसंकल्पात गरिबांचे हित केंद्रस्थानी आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भाजपच्या पहिल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते.
ते म्हणाले की, पुढील लोकसभेपूर्वी हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असला तरी त्याला कोणीही निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प म्हणत नाही. सर्वांगीण विकास आणि समाजातील प्रत्येक घटकाचे हित हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे असे ते म्हणाले.
भाजपला वैचारिकदृष्ट्या विरोध करणाऱ्यांनीही अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोदींनी केलेल्या भाषणांचा तपशील पत्रकारांना सांगितला.
राज्यातील सर्व शाळांमध्ये पुढील वर्षापासून साजरा होणार आजी आजोबा दिवस – मंत्री दीपक केसरकर
पंतप्रधानांनी खासदारांना, विशेषत: शहरांतील लोकांना क्रीडा संमेलने आयोजित करण्याची सुचना केली आहे. ज्या ठिकाशी क्रिडे क्षेत्राचा फारसा प्रभाव नाही अशा शहरांमध्ये हे क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात प्राधान्य दिले जावे असेही त्यांनी म्हटले आहे.