केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचा भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होत असून, बहुजन समाजही भाजपच्या बरोबर आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी भाजपात यावे, आसे आवाहन रिपल्बिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
सर्वच दलित संघटनांची एकत्र मूठ बांधण्यासाठी जर प्रकाश आंबेडकरांनी आवाहन केले, तर तुम्ही भाजपला सोडणार का? असा प्रश्न आठवलेंना विचारण्यात आला होता. त्यावर आठवलेंनी तयारी दर्शविली आहे. ते म्हणाले की, दलित चळवळीच्या ऐक्याची माझी भूमिका कायम आहे, परंतु आंबेडकरांनीच भाजपात यायला हवं, असेही आठवले म्हणाले.
आठवले पुढे म्हणले की, माझा भाजपला प्रत्यक्ष फायदा होतोय, तर वंचित बहुजन आघाडीचा अप्रत्यक्षरीत्या फायदा होतोय. आणि बहुजन समाजही भाजपच्या बरोबर आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी भाजपात यायला हवं, तसेच गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून बहुजन समाज भाजपासोबत आला आहे.
आता, भाजापानेही आपली भूमिका बदलली असून, हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आपलं राजकारण करता येणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहित झाल आहे. त्यामुळेच, बाबासाहेबांच संविधान नसतं, तर मी कधीच पंतप्रधान झालो नसतो, असे मोदी सांगतात. भाजपा पक्ष पूर्वीसारखा राहिला नसून बदलला असल्याचे आठवलेंनी स्पष्ट केल आहे.