जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा चक्रीवादवळासंदर्भात दौरा
मंचर- चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथे चक्रीवादळमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. नुकसानीचा अहवाल सरकारकडे पाठविला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, कृषी सभापती बाबुराव वायकर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी भिकाजी तुकाराम बांगर यांच्या नुकसान झालेल्या कांदा चाळीची पाहणी केली. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.